
देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” या डिजिटल चळवळीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अल्पावधीतच या चळवळीने मोठा प्रतिसाद मिळवत विक्रम नोंदवला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने डिजिटल पातळीवर काही कार्यवाही केल्याची माहिती समोर आली आहे.
या आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ६ जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची हाक दिली होती. नीट पेपरफुटी प्रकरणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला तरुणांचा प्रतिसाद लाभला.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाबाबत मोठं विधान केलं आहे. ठाकरे म्हणाले, “सरकारला तरुणांचे ऐकावंच लागेल… हजारो तरुण वेदनांसह रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरलेत. सरकारमुळेच तरुण वर्गाचं भविष्य उध्वस्त झालंय.”