Headlines

Malviya Nagar Hotel Fire : आगीमुळे होत्याचं नव्हतं झालं, एका झटक्यात अख्ख कुटुंब संपलं, पाठोपाठ वडीलही…

Malviya Nagar Hotel Fire : आगीमुळे होत्याचं नव्हतं झालं, एका झटक्यात अख्ख कुटुंब संपलं, पाठोपाठ वडीलही…
Malviya Nagar Hotel Fire : आगीमुळे होत्याचं नव्हतं झालं, एका झटक्यात अख्ख कुटुंब संपलं, पाठोपाठ वडीलही…


राजधानी दिल्लीतील गेल्या आठवड्यात घडलेल्या आगीच्या भीषण दुर्घटनेने अनेकांचे बळी घेतले.2 निष्पाप लोकं जीवाला मुकले. याच आगीत गुडगावमधील मुकेश अग्रावल आणि त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा बळी गेला होता. ज्याने अख्ख शहर हादरलं. मुकेश अग्रवाल, त्यांची आई, आणि नातेवाईंकासह एकूण 8 जणांचा बळी गेला. अग्रवाल यांचे वडील राधेश्याम यांच्यावर दिल्लीत मॅक्स रुग्णालयात उपटार सुरू होते. त्यांची भेट घेण्यासाठी विचारपूस करण्यासाठी कुटुंबीय दिल्लीत आले आणि हॉटल फ्लोरिश स्टे बी अँड बी मध्ये थांबले होते. मात्र त्याच हॉटेलमध्ये लागलेल्या आगीने त्यांचा बळी घेतला. या प्रकरणात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आगीत आपल्या कुटुंबियाना गमावणाऱ्या, 75 वर्षीय राधेश्याम अग्रवाल यांचाही आता मृत्यू झाला आहे. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे त्यांची अख्खी पिढीच संपली आहे.

30 मे रोजी रुग्णालयात दाखल झाल

गुडगावमधील येथील सेक्टर-46 मध्ये राहणारे आणि चार्टर्ड अकाउंटंट (CA) असलेले विवेक अग्रवाल आपल्या कुटुंबासह ‘फ्लोरिश स्टे बी अँड बी’ (Flourish Stay B&B) हॉटेलमध्ये राहत होते. त्यांचे वडील राधेश्याम अग्रवाल यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे 30 मे रोजी त्यांना मे रोजी साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं , ते व्हेंटिलेटरवर होते. हॉस्पिटलच्या भेटीच्या नियोजित वेळा लक्षात घेऊन हे कुटुंब जवळच असलेल्या त्या हॉटेलमध्ये राहू लागलं.

भावाने केले अंत्यसंस्कार

मात्र 3 जून रोजी त्या हॉटेलला लागलेल्या आगीत विवेक अग्रवाल, त्यांची पत्नी तर्जनी, त्यांच्या दोन मुली, त्यांची आई (राधेश्याम यांची पत्नी) आणि तीन नातेवाईक अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह दिल्लीहून गुडगावमधील सेक्टर-46 येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यानंतर, नातेवाईक आणि स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत सेक्टर-32 मधील ‘मोक्ष धाम’ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर त्यानंतर ग्रवाल यांचे वडील, राधेश्याम यांचेही निधन झाले. त्यांच्या भावाने अंत्यसंस्कार केले. अवघ्या आठवड्यभरात अख्खं कुटुंब नष्ट झालं, हे किती दुर्दैवी ! उपस्थितांच्या डोळ्यातील अश्रूंना खळ नव्हता.

हॉटेलच्या आगीत अनेकांचा मृत्यू

मालवीय नगरमधील आगीच्या दुर्घटनेत 12 परदेशी नागरिकांसह एकूण 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलचा मालक, आचारी केशव नेगी आणि लेखापाल जय मिश्रा यांना अटक केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *