Headlines

मोठी बातमी! खासदारानंतर आता आमदारही फुटणार? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित

मोठी बातमी! खासदारानंतर आता आमदारही फुटणार? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित
मोठी बातमी! खासदारानंतर आता आमदारही फुटणार? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित


मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश होणार आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे, मात्र या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी फक्त 4 खासदारांचीच उपस्थिती होती, त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये राज्याने ऑपरेशन टायगर पाहिलं. 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली, हे सर्व खासदार आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आला आहे.

तर दुसरीकडे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे, परंतु या बैठकीला तीन आमदार उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. आमदार संजय पोतनीस, आमदार संजय दरेकर आणि आमदार राहुल पाटील हे या बैठकीला अनुपस्थित आहेत. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. आमदारांची उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बैठकस्थळी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

बंडखोर खासदांराची शिंदेंसोबत बैठक 

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून बंड केलेले सर्व खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या सर्व बंडखोर खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक सुरू आहे. गेल्या दोन तासांपासून ही बैठक सुरू आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. या खासदारांचं बंड हा शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे जिथे-जिथे बंडखोरी झाली, त्या सर्व मतदारसंघात आता उद्धव ठाकरे भेट देणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *