
मुंबईत मुसळधार पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैतरणा आणि विरार दरम्यान एका महिलेचा ट्रेनखाली चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नारंगी फाटकाजवळ ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचवेळी ही घटना घडली असावी.घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
या दुर्घटनेमुळे मुंबईकडे येणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. अनेक प्रवाशांना याचा फटका बसला असून रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.