
देशातील काही भागात जोरदार पाऊस सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुखेंदु शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बडाईक यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तीन राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार असून निवडणूक आयोगाकडून त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे.
सुखेंदु शेखर रॉय यांनी 8 जून 2026 रोजी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर सुष्मिता देव यांनी 10 जून 2026 रोजी खासदारकीचा राजीनामा दिला. त्याच्या दुसर्या दिवशी प्रकाश चिक बडाईक यांनीही खासदारकीचा राजीनामा दिला. या तिन्ही जागांचा कार्यकाळ अनुक्रमे 2029 आणि 2030 सालापर्यंत आहेत. आता तिन्ही जागेसाठी 24 जुलै 2026 रोजी निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, तिन्ही जागेसाठी 7 जुलै 2026 ते 14 जुलै 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 जुलै रोजी आहे. त्यानंतर या जागांसाठी मतदान 24 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 5 वाजता होईल.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की, बॅलेट पेपवर उमेदवाराला पसंती दर्शवण्यासाठी रिटर्निंग ऑफिसरद्वारे जांभळ्या रंगाचा स्केच पेन वापरावा लागेल. कोणत्याही परिस्थिती दुसरा स्केचपेन वापरता येणार अधिसूचना जारी केल्या आहेत. सभागृहातील पोटनिवडणुकीच्या रिक्त जागा स्वतंत्र्य म्हणून गणल्या जातात. त्यामुळे प्रत्येक रिक्त जागेसाठी स्वतंत्र्य अधिसूचना जारी केली जाते.
पश्चिम बंगालमध्ये राजकारण फिरलं
तत्पूर्वी, पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण फिरलं आहे. मागील दशकापासून सत्ता गाजवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भाजपने सत्तेवरून खाली खेचलं. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ता मिळवली. भाजपला सत्ता मिळाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये फोडाफोडीचं राजकारणही सुरू झालं आहे. निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचे जवळपास 58 आमदार फुटले. त्यानंतर काही खासदार देखील फुटले. फुटीर आमदार-खासदारांनी सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला.