Headlines

IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या

IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या
IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या


IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्याImage Credit source: BCCI

आयर्लंडकडून टी20 मालिकेत मात खाल्ल्यानंतर इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका जिंकण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. पण इंग्लंडविरुद्धची मालिका वाटते तितकी सोपी नाही. कारण इंग्लंडचे वेगवान गोलंदाज या मालिकेसाठी खास तयारी करत आहेत. विशेषत: जोफ्रा आर्चरने या मालिकेसाठी खास प्लान आखला आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात जोफ्रा आर्चर खेळणार हे जवळपास स्पष्ट आहे. असं असताना त्याने या सामन्यापूर्वी बुटावर नेम धरून गोलंदाजी करण्याचा सराव केला. त्याच्या सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बूट क्रिजवर ठेवून त्यावर मारा करत आहे. अचूक यॉर्कर टाकण्यासाठी असा सराव केला जातो. म्हणजेच जोफ्रा आर्चर भारताविरुद्ध यॉर्कर अस्त्र वापरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारतीय पाय सांभाळून खेळावं लागणार आहे.

टीम इंडिया यॉर्करचा सामना कसा करणार?

भारतीय खेळाडूंना यॉर्करचा सामना कसा करायचं? चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बहुतांश भारतीय फलंदाज लॅप शॉट्स खेळत नाहीत. पारंपरिक पद्धतीने फटके मारून धावा करतात. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर जास्त लॅप शॉट खेळत नाहीत. हा शॉट प्रामुख्याने विकेटकीपरच्या मागे किंवा फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने मारला जातो. शिवम दुबे आणि अक्षर पटेल हे देखील क्वचितच हा फटका मारतात. पण इशान किशन आणि तिलक वर्मा हा फटका मारण्यात तरबेज आहेत. चेंडू पडण्यापूर्वीच फलंदाज आपल्या जागेवरून किंचित लेग-स्टंपच्या बाहेर सरकतो. चेंडूच्या लाईनमध्ये येण्यासाठी फलंदाज आपला पुढचा पाय पुढे काढतो आणि एका गुडघ्यावर खाली वाकतो. फलंदाज ताकदीचा वापर न करता फक्त बॅटचा कोन फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने फिरवतो. त्यामुळे यॉर्कर चेंडूचं रुपातर लो फुलटॉसमध्ये होते.

भारतीय फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय

भारतीय फलंदाजांचा फॉर्म मागच्या मालिकेपासून चिंतेचा विषय ठरला आहे. एकही फलंदाज मॅच विनिंग खेळी करू शकलेला नाही. संजू सॅमसन आणि इशान किशन हे दोन्ही खेळाडू हव्या तशा धावा करू शकले नाहीत. अभिषेक शर्माने तीन सामन्यापैकी फक्त एका सामन्यात अर्धशतक ठोकण्यात यशस्वी ठरला आहे. इशान किशनला तर इंग्लंडविरुद्ध खातंही खोलता आलं नाही. त्यात तिलक वर्माची संथ खेळी पाहून चिंता वाढली आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या टी20 सामन्यात संधी मिळणार का? हा देखील प्रश्न आहे. कारण पहिल्या सामन्यात त्याला बेंचवर बसवलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *