Headlines

IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…

IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…
IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…


IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…Image Credit source: IPL/BCCI

आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची पुरती वाताहत झाली. यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. तर 10 सामने गमवत गुणतालिकेत शेवटून दुसरं स्थान पटकावलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पाच वेळा जेतेपद मिळवलेल्या संघाची अशी स्थिती पाहून संताप व्यक्त करण्यात येत आहे. असं असताना हार्दिक पांड्या कर्णधारपदच नाही तर संघाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याने आयपीएल 2026 स्पर्धेच्या मध्यातच हा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्याने आपला निर्णय फ्रेंचायझीला कळवला असून त्याला तेथूनही हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे. आता हार्दिक पांड्याने असा निर्णय घेण्याचं कारण काय? ते जाणून घेऊयात..

रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचा प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्यानंतर हार्दिक पांड्याने मॅनेजमेंटला सांगितल होतं की आता संघात राहणार नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी मागच्या तीन वर्षात हवी तशी राहिली नाही. मागच्या पर्वात प्लेऑफमध्ये जागा मिळवली पण पदरी निराशा पडली. त्यामुळे हार्दिक पांड्याने संघापासून वेगळं होण्याचं निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. हार्दिक पांड्या 2021 मध्ये मुंबई सोडून गुजरात टायटन्स संघात गेला होता. त्यानंतर 2024 मध्ये संघात परतल्यानंतर त्याला चाहते आणि खेळाडूंचं हवं तसं सहकार्य मिळालं नसल्याची चर्चाही क्रीडावर्तुळात रंगली आहे.

हार्दिक पांड्याला कोणी त्रास दिला?

सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांवरून चर्चा होतं. त्यात एक कारण वेगळंच आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या एका वरिष्ठ खेळाडूवर खूपच नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. या वरिष्ठ खेळाडूने टी20 वर्ल्डकपदरम्यान 100 टक्के कमिंटमेट मागितली होती. पण मुंबई इंडियन्समध्ये परतला तेव्हा त्या खेळाडूने साथ दिली नाही. त्यामुळे हा वरिष्ठ खेळाडू कोण? या चर्चाही रंगल्या आहेत. पण सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चांना तसा काही अर्थही नसतो. आता हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर पुढे काय?पांड्या ट्रेड डीलच्या माध्यमातून मुंबई सोडेल की लिलावात उतरेल. हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्सचा भाग होऊ शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *