
जूनची 17 तारीख आली. मात्र, मॉन्सून काही राज्यात दाखल झाला नाही. त्यामध्येच आता मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा पुढे येत आहे. ओडिसा, तेलंगणा, बिहार, झारखंड या भागात मॉन्सून दाखल झाला. पूर्वेकडून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यामुळे पोषक वातावरण मिळाले. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सूनची स्थिती जैसे थे आहे. काहीच प्रगती मॉन्सूनची अरबी समुद्रात दिसत नाही. एकाच ठिकाणी मॉन्सून रेंगाळत आहे. 20 जून 2026 रोजी मॉन्सून मुंबईसह राज्यात दाखल होण्याचा अंदाज होता. मात्र, सध्याची मॉन्सूनची स्थिती बघता राज्यात मॉन्सून दाखल होण्याकरिता अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल. ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. मॉन्सूनची सध्याची स्थिती बघता राज्यात 20 जूनला देखील मॉन्सूनचा पाऊस नसेल. पुढील आठ दिवस म्हणजे जून महिनाही मॉन्सूनशिवाय कोरडा जाण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मॉन्सूनला आग्रेय दिशेने वारा अडथळा निर्माण करत आहे. तरीही मॉन्सून हळूहळू करून पुढे सरकत आहे. मात्र, अरबी समुद्रातून अत्यंत वाईट बातमी येतंय. राज्यात दाखल होणाऱ्या मॉन्सूनही अजिबातच प्रगती नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्याकरिता अजून वाट पाहवी लागणार आहे. हर्णे, सोलापूर, हैद्राबाद, कोरापूट, फलबाणी, रांची, जमुईपर्यंत पुढे मॉन्सून पुढे सरकत आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. पहिल्यांदा सांगण्यात आले की, 15 जून 2026 पर्यंत राज्यात मॉन्सून दाखल होईल. त्यानंतर 20 जूनला मॉन्सूनच्या पावसाचा अंदाज होता. मात्र, आता थेट 8 दिवस महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचा वेळ लागू शकतो, असा अंदाज आहे. ज्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहेत. शिवाय राज्यातील जवळपास धरणातील पाणीसाठा तळाला गेला. ज्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट उभे आहे.
मॉन्सून रखडलेला आहे. त्यामध्येच राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. पुढील दोन ते तीन दिवसात तापमानात अधिक वाढ होण्याचे संकेत आहेत. पाणीटंचाई आणि वाढती उष्णता ही मोठी समस्या निर्माण झाली. यासोबतच धरणातील पाणीसाठा वाचवण्याकरिता पाणीकपात करण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला आहे.