
दूषित पाणी प्यायल्याने अनेक आजार किंवा इंफेक्शन होऊ शकतात. त्यामुळे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवायला सांगितले जाते. मात्र, अलीकडेच याबाबत एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. मंत्रालयातील दूषित पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील पाण्याच्या टाकीत मांजर पडलेली होती. हेच पाणी प्यायल्याने कर्मचारी आजारी पडले आहेत. त्यानंतर मंत्रालयातील पाण्याची टाकी योग्य रीतीने स्वच्छ करण्यात आली होती.