
आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणूक पार पडली. तसेच विषेश सभेचे आयोजन करण्यात आले होते. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पडळकर हे ईश्वरपूरमध्ये आले नव्हते. आता ईश्वरपूरमध्ये गेल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शायरीच्या माध्यमातून कोणाचेही नाव घेतला मोठा वक्तव्य केले आहे.
जिंदगी जीते है हम शान से…
टिकेनंतर ईश्वरपूरमध्ये पहिल्यांदाचं आलेल्या गोपीचंद पडळकरांचे धनगर समाज बांधवांनी खांद्यावर बसवुन जोरदार स्वागत केले. यावेळी सभेतून गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता शायरीतून निशाणा साधला. मैने बोला था, एन्ट्री लेट होगी, पर ग्रेट होगी… जिंदगी जीते है हम शान से… तभी तो दुश्मन जलते है हमारे नाम से… अशा शायराना अंदाजामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांना डिवचले आहे. ममता बॅनर्जीची सत्ता जाऊ शकते, तर एका साध्या आमदाराचे टेन्शन कशासाठी घेता, असा खोचक टोला देखील पडळकरांनी लगावला आहे.
धनगर आरक्षणाचा मुद्दा
तसेच सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील पुन्हा मांडला आहे. धनगर आरक्षणाची लढाई आपण लढतोय, एक लाख टक्के आरक्षण मिळवण्यासाठी जी काही ताकद लावायची आहे ती आपल्याला लावावी लागेल,असं आवाहन देखील यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर
ईश्वरपूरमध्ये कुठेच अहिल्यादेवीचे स्मारक नाही. त्यामुळे ईश्वरपूरमध्ये आपल्याला लोकसहभागातून अहिल्यादेवी चे स्मारक उभा करणार असल्याचे आणि अहिल्यादेवी पुतळा देखील लोकवर्गणीतून उभा करू असे मत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभेत बोलताना व्यक्त केल आहे.