
नुकताच एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. अज्ञाताकडून धमकीचा मेल आला. या धमकीच्या मेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली. यानंतर तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला. अज्ञाताविरोधात पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही नोंद करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारच्या धमकीचे मेल किंवा फोन येण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. स्थानिक पोलिस, बीडीडीएसच्या पथकाकडून विमानतळ परिसराची तपासणी केली जात आहे. यादरम्यान संशयास्पद काहीही न सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. मात्र, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. कसून तपासणी केली जात आहे. मुंबई विमानतळावरून दररोज हजारोंच्या घरात विमानांचे उड्डाण होते.
लाखोच्या घरात प्रवासी ये-जा करतात. देशातील महत्वाचे विमानतळ मुंबई विमानतळाकडे बघितले जाते. यादरम्यानच धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे. मेलमध्ये थेट मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली. या धमकीच्या मेलनंतर यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर मेल करत ही धमकी देण्यात आली होती. ज्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली होती. ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोवरच आता पुन्हा अशाचप्रकारचा मेल आला.
यासोबतच दोन दिवसांपूर्वीच पुण्याच्या आणि मुंबईच्या महापाैरांना धमकीचा मेल आला होता. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एका अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची आणि त्यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. अशाचप्रकारची धमकी पुण्याच्या महापाैरांनाही देण्यात आली होती. ज्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता पुन्हा अशाच प्रकारचा मेल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सतत धमकीचे फोन येत असल्याचे बघायला मिळतंय.