
शिवसेना उबाठाचे प्रमुख ठाकरे यांनी आज (२१ एप्रिल २०२६) रोजी भारतीय कामगार सेनेच्या ५८ व्या वार्षिक सभेत कार्यकर्त्यांना संबोधित केले. या मेळाव्यात त्यांनी ‘ठाकरे ब्रँड’बाबत मोठं विधान करत, त्याची खरी सुरुवात अजून व्हायची असल्याचं सांगितलं. एकदा सुरुवात झाली की त्याचा प्रभाव सर्वांना दिसेल, असा इशाराच त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. दरम्यान त्यांच्या वेस्ट बंगालबाबतच्या एका विधानाने चर्चेला उधाण आलं आहे.
ठाकरे म्हणाले की, तुम्ही लोकसभेत महिलांच्या सन्मानाबाबत बोलता मात्र एका महिलेला हरवण्यासाठी तुम्ही ईडी लावता. निवडणूक जिंकण्यासाठी सगळे नेते बंगालमध्ये पोहोचलेत, आमचे मुख्यमंत्री सुद्धा… बंगालमध्ये एक वाघीण एकटी लढतेय ती जिंकलीच पाहिजे.
यादरम्यान त्यांनी सध्याच्या राजकारणावर टीका करत त्याची तुलना IPL या शब्दाशी केली ‘इंडियन पोलिटीकल लिग’ अशी केली. जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर लगावला.