
पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी नागरिकांनी आरोपीवर तातडीने खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान काहींनी आरोपीचा ताबा मागितला आहे.
घटनास्थळी उपस्थित असताना सुनेत्रा पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन करून नागरिकांच्या भावना मांडल. असं सांगितलं जात आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.