
याच जन सेना पार्टीच्या पवन कल्याण यांनी सोमवारी एका सरकारी कार्यक्रमात प्रामाणिकपणे कबूल केलं की, तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री विजय यांना इतक्या लवकर मिळालेलं यश पाहून थोडी ईर्ष्या वाटते. तामिळनाडूच्या राजकारणाकडे पाहून दुसऱ्यांसाठी हे सोपं होतं असं वाटतं. ते कटआऊट, पोस्टर आणि होलोग्रॅमने जिंकतात. मी मागच्या 15 वर्षांपासून रस्त्यावर फिरतोय. राजकीय पक्ष चालवण्याचा अर्थ असतो लाखो लोकांना एकत्र करणं.