
त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याचे चित्रीकरण सुरू असतानाच बच्चन कुटुंबात मोठ्या लग्नाची तयारी सुरू होती. फराह खान म्हणाल्या की, त्या काळात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाची लगबग सुरू होती. त्यामुळे अमिताभ बच्चन संपूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वेळ देता आला नाही.