शिर्डीत प्रसादाचा लाडू कमी झाला, हॉटेल बंद पडली, किमान देवासमोर तरी…; संजय राऊतांनी मोदी-फडणवीसांना घेरले
राज्यातील इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही, केवळ काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणे थांबवावे आणि…