Headlines

Chanakya Niti : मोठं यश मिळालं तरी शांत राहा, चाणक्य यांनी सांगितले आयुष्यातील 4 कटू सत्य

Chanakya Niti : मोठं यश मिळालं तरी शांत राहा, चाणक्य यांनी सांगितले आयुष्यातील 4 कटू सत्य
Chanakya Niti : मोठं यश मिळालं तरी शांत राहा, चाणक्य यांनी सांगितले आयुष्यातील 4 कटू सत्य


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात यश अपयश सुरूच असतं. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मानसानं संयम सोडला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे दोन्ही स्थितीमध्ये मानसाने शांत रहावं. जेव्हा कधी तुमच्या वाट्याला अपयश येतं तेव्हा, ते तुम्ही जगाला कधीच सांगू नका, यामुळे तुमचंच नुकसान होणार असतं. त्यामुळे तुम्हाला जर अपयश आलं असेल तर अशा स्थितीमध्ये शांत राहा, आपल्याला अपयश का आलं? त्याच्या कारणाचा शोध घ्या आणि पुन्हा कामाला लागा त्यानंतर तुम्हाला नक्कीच यश मिळेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे असंही म्हणतात की एकवेळेस माणूस आपला पराभव झाल्यानंतर शांत बसू शकतो. मात्र जेव्हा त्याला यश मिळतं, तेव्हा तो कधीच शांत बसू शकत नाही. तो संपूर्ण जगाला आपलं यश ओरडून सांगतो, त्या यशाचा आनंद साजरा करातो. या जगात तर असे अनेक लोक आहेत, ज्यांना आपलं यश पचवता येत नाही. त्याचा परिणाम असा होतो की अशा लोकांचे समाजात खूप सारे शत्रू तयार होतात, त्यामुळे तुम्हाला जेव्हा यश मिळालं असेल, तेव्हा देखील तुम्ही शांत राहिलं पाहिजे, असं चाणक्य नीती म्हणते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शत्रू – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला यश मिळतं, आणि तुम्ही हे यश जगाला ओरडून सांगतात, तेव्हा आपोआपच तुमचा द्वेष करणारे लोक या समाजात तयार होतात, त्यामुळे आपलं यश हे एकांतात सेलिब्रेट करा, ते कोणालाही सांगू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

मत्सर – चाणक्य म्हणतात तुम्हाला जेव्हा यश मिळतं, तेव्हा तुम्ही शांत बसलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा ही गोष्ट इतरांना सांगतात तेव्हा ते तुमचा मत्सर करू लागतात कारण त्यांना ती गोष्ट प्राप्त झालेली नसते. ते तुम्हाला मागं ओढण्याचा प्रयत्न करतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

नियंत्रण – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळतं, तेव्हा तुम्ही त्या यशाने हुरळून जातात, परिणामी तुमचं तुमच्या मनावर नियंत्रण राहत नाही, त्याचा फटका तुम्हाला नंतर तुमच्या कामात बसतो, त्यामुळे तुम्हाला जेव्हा यश मिळतं तेव्हा माणसानं शांत राहावं.

नियोजन – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश मिळालं की त्यानंतर त्याचा जास्त उत्सव न करता, लगेच पुढच्या यशासाठी नियोजन करणं गरजेचं असतं, असा सल्ला चाणक्य यांनी दिलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *