वाऱ्याने मंडप उडून गेला, स्वयंपाक भिजला, तरीही भर पावसात शुभमंगल सावधान झाले !
नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं. मात्र या पावसाचा फटका लग्न समारंभालाही बसला. जोरदार वाऱ्यासह नेमकी पावसाची सर अशी काही आली की मंडपच उडून गेला. त्यामुळे विवाहाची घटिका समीप आली तरी पाऊस काही थांबण्याचे नाव घेईना. अखेर छत्री धरुनच भटजी बुवांनी मंगलाष्ठका म्हटल्या आणि वऱ्हाडी मंडळींनी अक्षता टाकल्या हे शुभमंगल पार पडले. नांदेड जिल्ह्यात अवकाळी…