
कमकुवत स्क्रीनप्ले- कथा ही कुठल्याही चित्रपटाची मजबूत बाजू असते, स्क्रीनप्ले तगडा नसेल, तर ही चित्रपटाची सर्वांत कमकुवत बाजू ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य असंख्य घटनांनी भरलेलं होतं, परंतु ‘राजा शिवाजी’मधील काही सीन्स गरजेपेक्षा अधिक खेचल्यासारखे वाटतात. यामुळे चित्रपटाच्या गतीवर त्याला परिणाम झाला आहे. चित्रपटाची पटकथा आणि मांडणी बांधेसूद करण्यावर अधिक भर द्यायला हवा होता, असं वाटतं.