
काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांचं नाव जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. या निर्णयामुळे विविध राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता पुन्हा बच्चू कडू यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच बच्चू कडू यांनाही टोला लगावल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींना त्यामुळे पुन्हा वेग आला आहे.