Headlines

फळ अथवा भाजीपाल्याला लागला सापाचा दात… खाणाऱ्याचा मृत्यू होणार? व्हायरल दाव्याचे सत्य काय?

फळ अथवा भाजीपाल्याला लागला सापाचा दात… खाणाऱ्याचा मृत्यू होणार? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
फळ अथवा भाजीपाल्याला लागला सापाचा दात… खाणाऱ्याचा मृत्यू होणार? व्हायरल दाव्याचे सत्य काय?


सापाच्या विषाने भाजपीला होतो खराब?Image Credit source: एजन्सी

Snake Bite on Vegetables Result: साप पाहिला तरी अनेकांचा घाबरगुंडी उडते. सापाला पाहून काही जण पळ काढतात. तर काही जणांची बोबडी वळते. बिनविषारी सापाने दंश केला तरी धक्क्याने अनेकांचा मृ्त्यू ओढावतो. साप हा रानोमाळी फिरतो. तो शेतातही आढळतो. तो फळांच्या झाडावरही दिसतो. अशावेळी जर सापाने एखाद्या फळाला दंश केला. शेतातील भाजीपाल्याला सापाचा विषारी दात लागला, तर भाजीपाला, फळं विषारी होतात का? त्याने माणसाचा मृत्यू होतो का? काय आहे याविषयीचे सत्य?

सापाने दंश केल्याने भाजपील्यात उतरते विष?

जर सापाने काकडी, भोपळा वा इतर फळांना दंश केला, त्याचे दात भाजीपाला अथवा फळाला लागला तर ते विषारी होतात का? हा अन्नघटक मनुष्याच्या पोटात गेला तर त्याचा मृत्यू होतो का? तज्ज्ञांचे मते त्याचे दुष्परिणाम अत्यंत कमी असतात. त्यामागील काही कारणंही समोर आली आहेत.

1. विषाची परीक्षा: तर सापाचे विष हे Venom असते. ते Poison नसते. म्हणजे सापाचे विष तेव्हाच घातक ठरते, जेव्हा ते थेट मनुष्याच्या रक्तात मिसळते. जेव्हा साप एखाद्या फळावर विषाचा घटक सोडतो, तेव्हा त्याचा परिणाम तितका होत नाही. तज्ज्ञांच्या मते पोटातील रसायनं त्याला पचवून टाकतात. पण जर तोडात अथवा ओठांना, गळ्यात अथवा पोटात जखम असेल तर मात्र वेगळा परिणाम होऊ शकतो.

2. संपूर्ण फळ खराब होत नाही: फळ अथवा भाजीपाला हा लागलीच संपूर्णपणे खराब होत नाही. सापाचे विष जरी फळाला लागले तरी एक भाग खराब होतो अथवा त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होते. हे विष फळाच्या आतपर्यंत पोहचत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

3. साप शक्यतो उंदीर, बेडूक, सस्तन प्राणी, पक्षी यांच्यावर प्रतिक्रिया देतो. भीतीपोटी तो हल्ला चढवतो. पण भाजीपाला, फळं यावर तो असा हल्ला करत नाही. त्यामुळे सापाचे विष फळाला लागून एखाद्याचा मृत्यू झाल्याची घटना अजून समोर आलेली नाही. भाजीपाला, फळं घरी आल्यावर ती धुतल्या जातात. भाजी शिजवल्या जाते. त्यामुळे बरेच विषारी घटक निघून जातात.

4. सापाने माणसाला दंश केला तर त्याचे विष हे मानवी शरिरात भिनते. विषाचा परिणाम हा तेव्हाच होतो, जेव्हा रक्तवाहिन्यांतून ते शरीरात भिनते. अनेक जण विषारी औषध घेऊन जीवन संपवतात. ते विष आणि सापाच्या विषात फरक आहे. फळ वा भाजीपाल्यावाटे ते विष मानवी शरीराला अपाय पोहचवू शकत नाही.

5. तज्ज्ञांच्या मते, सापाच्या विषामुळे भाजीपाल्याचा रंग, चव अथवा इतर कोणत्या घटकावर फारसा परिणाम दिसत नाही. त्यामुळे त्यावर सापाचे विष लागलेले आहे हे डोळ्यांनी दिसत नाही. साप जरी शेतातून फिरत असला तरी त्याचे विष भाजीपाल्याला लागत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *