
एका मुलाखतीत विद्या बालनने सांगितले होते की, सतत मिळणारे नकार आणि लोकांच्या कटू वागणुकीमुळे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. अनेकदा ती रडत-रडत झोपायची. तिने दक्षिणेतील चक्रम हा चित्रपट आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचेही सांगितले होते. मात्र, हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने तिच्या करिअरला मोठा धक्का बसला.