Headlines

आर्मीमधील कुत्र्यांना रिटायरमेंटनंतर खरंच मारलं जातं का? नेमकं काय आहे कारण? सत्य तुम्हालाही माहिती नसेल

आर्मीमधील कुत्र्यांना रिटायरमेंटनंतर खरंच मारलं जातं का? नेमकं काय आहे कारण? सत्य तुम्हालाही माहिती नसेल
आर्मीमधील कुत्र्यांना रिटायरमेंटनंतर खरंच मारलं जातं का? नेमकं काय आहे कारण? सत्य तुम्हालाही माहिती नसेल


आरमीमधील कुत्र्यांचं रिटायरमेंटनंतर काय करतात?Image Credit source: टीव्ही 9 मराठी

आर्मी आणि पोलीस दलांमध्ये तपास कामांसाठी कुत्र्यांची मदत घेतली जाते. कुत्रा हा असा प्राणी आहे, जो बुद्धिमान तर आहेच परंतु अतिशय प्रामाणिक देखील असतो. कुत्र्यांना सहज ट्रेन केलं जाऊ शकतं. तसेच तो नुसत्या वासावरून देखील एखाद्या व्यक्तीचा सहज माग काढू शकतो. त्यामुळे चोरांचा तसेच एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांना श्वानांची खूप मदत होत असते. कोणत्याही देशाची आर्मी किंवा पोलीस दल असो तिथे एक श्वानपथक हे असतंच. आर्मी आणि पोलीस दलासोबत काम करण्यासाठी काही खास विशिष्ट प्रजातीच्या श्वानांची निवड केली जाते. त्या श्वानाला ट्रेनिंग दिलं जातं. या ट्रेनिंग नंतर हे श्वान रिटायरमेंटपर्यंत आर्मी किंवा पोलीस दलासोबत काम करतात. मात्र अनेकदा असं देखील म्हटलं जातं की, रिटायरमेंटनंतर आर्मीमधील कुत्र्यांना मारलं जातं. नेमकं त्यामागचं सत्य काय आहे? तुम्हाला माहितीये का?

पूर्वी म्हणजे ब्रिटीश काळात ही पद्धत होती. ब्रिटीश काळात आर्मीमधून एखादा श्वान निवृत्त झाला की, त्याला मारण्यात येत होतं. त्यामागचं लॉजिक असं होतं की, या श्वानाने अनेक वर्ष आर्मीसोबत काम केलं आहे, त्यामुळे त्याला देशाच्या अनेक गुप्त गोष्टी माहिती असतात. असा श्वान शत्रूच्या हाती लागला तर त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा श्वानांना मारलं जायचं. साधारणपणे एका श्वानाचं आयुष्य हे 20 वर्षांपर्यंत असतं, आर्मी किंवा पोलीस दलातील श्वान हे 13 व्या किंवा 14 व्या वर्षी निवृत्त होतात, कारण तेव्हा त्याची क्षमता कमी झालेली असते.

दरम्यान याविरोधात प्राणीमित्र संघटनांकडून आवाज उठवण्यात आला, त्यामुळे आता नियमात बदल करण्यात आला आहे. आता आर्मी किंवा पोलीस दलातील कुत्र्यांना मारलं जात नाही. तर त्यांना आता मेरठ येथील ओल्ड ऐज होममध्ये ठेवण्यात येतं. तिथे त्यांची काळजी घेतली जाते. किंवा काही श्वान ही दत्तक देखील दिली जातात. आर्मीमधील कोणताही श्वान दत्तक देण्यापूर्वी त्याला पुन्हा एकदा सामान्य वर्तणुकीचं ट्रेनिंग दिली जाते. अगदीच नाइलाज असेल म्हणजे एखाद्या श्वानाला दुर्धर आजार असेल आणि तो बरा होणारच नसेल तर अशा स्थितीमध्ये क्विंचित प्रसंगी अशा श्वानांना दया मरणं दिलं जातं. मात्र आता आर्मीमधील कोणत्याही श्वानाला मारलं जात नाही, रिटायरमेंटनंतरही त्यांचा सांभाळ केला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *