Chandrashekhar Bawankule | निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचाच विजय?
राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध मतदारसंघांतील बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील बहुतांश अपक्ष आणि बंडखोर उमेदवार सकारात्मक चर्चेनंतर आपले…