सगळीकडे धो-धो… पहिलाच पाऊस जीवावर बेतला, वीज पडून तिघांचा मृत्यू; या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जवळपास संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. आज राज्याच्या कोणत्या भागात पावसाने हजेरी लावली ते जाणून घेऊयात….