खवय्यांचे बजेट कोलमडणार, वडापावपासून थाळीपर्यंत सगळंच महागलं, नवे दर काय?
देशातील रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योग सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. एकीकडे कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि दुसरीकडे इंधनाच्या किंमती यामुळे हॉटेल व्यावसायिक हैराण झाले आहेत. यामुळे आता अनेक हॉटेल व्यावसायिकांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मदतीचे साकडे घातले आहे. सरकारने वाढवलेले दर मागे घेऊन हॉटेल उद्योगाला सवलती द्याव्यात, अन्यथा ग्राहकांसाठी बाहेरचे जेवण महाग करण्याशिवाय…