नंदूरबारमध्ये बर्ड फ्ल्यूची धास्ती… चिकन, अंड्याच्या विक्रीवर बंदी, पोल्ट्री व्यवसाय संकटात; प्रशासन सतर्क
नंदूरबार जिल्ह्याला पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूचा विळखा पडला आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्री व्यवसायच संकटात आला आहे. राज्याच्या इतर भागात बर्ड फ्ल्यूची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे. गेल्या दोन दिवसात पावणे दोन लाख कोंबड्या ठार मारून नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच 8 लाख अंडेही नष्ट करण्यात आले आहेत….