Headlines

Omraje Nimbalkar: सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा गेम फसणार? ऑपरेशन टायगर धोक्यात? ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा झटका

Omraje Nimbalkar: सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा गेम फसणार? ऑपरेशन टायगर धोक्यात? ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा झटका
Omraje Nimbalkar: सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा गेम फसणार? ऑपरेशन टायगर धोक्यात? ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा झटका


सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. ठाकरे गटाने व्हीप जारी करुन तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील 6 खासदारांनी दांडी मारली. या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला आहे. या निकालानंतर मोठा ट्विस्ट आला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना मोठे विधान केले आहे.

तब्बल दोन दशकानंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज कोर्टाने दिला आहे. सबळ पुराव्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येत नाही असं कोर्टाने म्हटलं. ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला या निकालामुळे मोठा धक्क बसला आहे. त्यामुळे आता राज्यात राजकीय समीकरणे फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पवनराजे निंबाळकर केसच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. याबाबत ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सेनेत जाण्याचा अद्याप कोणता राजकीय निर्णय घेतलेला नाही. मतदार संघात जाऊन चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेणार असल्याचे ओमराजे यांनी स्पष्ट केले आहे.

कोर्टाच्या निकालावर ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

20 वर्षांनंतर कोर्टाच्या निकालावर बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, दुर्देवाने जो निकाल आहे, त्या निकालाला आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. उच्च न्यायालयाकडून आता न्यायाची अपेक्षा आहे. कोर्टाचा निकाल आहे आणि तो प्रत्येकाला स्वीकारावाच लागतो. हा पण त्याबाबत आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत. शेवटपर्यंत याकरिता आम्ही संघर्ष करणार आहोत. कोर्टात जे पुरावे आहेत, ते पुढे येणार आहेत. या प्रकरणाचा पहिल्यांदा तपास मुंबई पोलिस करत होते आणि मुंबई पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्यानंतर हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यांच्यावरही प्रचंड दबाव होता. म्हणून आम्ही 2008 मध्ये उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *