सट्टा लावला अन् एका रात्रीत नशीब बदललं! त्या गीतकाराच्या आयुष्यात त्या दिवशी काय घडलं?
हिंदी सिनेमांमध्ये गीतकारांचं अनन्यसाधारण महत्त्व राहिलें आहे. 40-50 च्या दशकात पैसा नसायचा पण गीतकारांना प्रचंड मान असायचा. त्याकाळातील सर्वच गाणी हिट आणि सदाबहार आहेत. आजही ही गाणी गायली जातात. पिढ्या आल्या आणि गेल्या, पण या गाण्यांचा गोडवा तसूभरही कमी झालेला नाही. आनंद बक्शी, मजरूह सुल्तानपुरी, साहिर लुधियानवी आदी एकापेक्षा एक गीतकारांनी तो काळ समृद्ध केला…