Headlines

नवनीत राणा राज्यसभेवर जाण्याची चर्चा हवेतच? राष्ट्रवादीच्या नेत्याने थेटच सांगितलं… म्हणाले, प्रत्येकवेळी…

नवनीत राणा राज्यसभेवर जाण्याची चर्चा हवेतच? राष्ट्रवादीच्या नेत्याने थेटच सांगितलं… म्हणाले, प्रत्येकवेळी…
नवनीत राणा राज्यसभेवर जाण्याची चर्चा हवेतच? राष्ट्रवादीच्या नेत्याने थेटच सांगितलं… म्हणाले, प्रत्येकवेळी…


नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी मोठे विधान केले. विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल बोलताना उमेश पाटील यांनी म्हटले की, महायुती म्हणून तीन पक्ष एकत्र आहोत. विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने त्यांनी माघार घेतली. पुण्याच्या जागेबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की,  श्रीकांत पाटील 30-40 मतांच्या जीवावर कशी निवडणूक लढवणार होते. महायुतीकडे 90 टक्के मतदान आहे. त्यामुळे सन्माजनक माघार कधीही चांगली. त्यांनी माघार घेतली, त्यांच्या सहकार्याबद्दल आभार. रोहित पवार यांच्या शेअर केलेल्या पोस्टबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, रोहित पवारांना आमच्या पक्षात काय सुरु यातच जास्त रस आहे. त्यांची विलिनीकरणाची इच्छा अपूर्ण राहिली. कोण कुठेही मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतो.

पुढे उमेश पाटील यांनी नवनीत राणा राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ही जागा आदरणीय सुनेत्रा पवार यांची रिक्त होणारी जागा आहे, त्यामुळे तिथे फक्त राष्ट्रवादीचाच उमेदवार असेल. याबाबत लवकरच कोर कमिटीची बैठक होईल कदाचित याबाबत आधी ही चर्चा झाली असेल. अशा चर्चा निवडणुकीच्या काळात होत राहतात.

त्यामुळे कुणी भेटले की अश्या चर्चा होत राहतात. प्रत्येक वेळी प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही. जी रणनिती पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी आखली ती तंतोतंत यशस्वी झाली. आमच्या दोन्ही जागा बीनविरोध निवडून आल्या. संजय राऊत यांना खर्च दाखवून केला असं म्हणावे लागले. ज्यांनी विरोधात अर्ज भरले त्यांची समजूत काढण्यात आली.

अनेक ठिकाणी आम्हाला दुपट्टीहून अधिक मतदान होणार होते. विरोधी उमेदवार जिंकून येण्याची शक्यता नसल्याने त्यांनी अर्ज मागे घेतले. त्यांचे स्वागत व्हायला पाहिजे. तो त्यांचा विषय आहे. श्रीकांत पाटील हे तीस चाळीस मतांवर कसे निवडणूक लढणार होते. तश्या परिस्थितीत अपमानास्पद पराभव होण्यापेक्षा त्यांनी सन्मानाने अर्ज मागे घेतला. उलट चांगले आहे.

सगळेच उमेदवार विरोधकांकडे जाऊन त्यांना विनंती करत असतात. रोहित पवार यांना सल्ला की, त्यांच्या मतदार संघातील प्रश्नांकडे पाहावे. एमआयडीसी आणणार हे त्यांनी वचन दिले होते त्यांचे काय झाले. आमच्या पक्षात काय चालले याकडे त्यांचे जास्त लक्ष आहे. त्यांचे जे विलिनीकरणाते स्वप्न होते ते आमच्या प्रदेशाध्यक्ष यांच्यामुळे भंगले त्यामुळे त्यांना त्रास होत आहे.

आमच्या नेत्यांनी असे काही घडले असेल तर आम्ही रोहित पवार यांनी लोकांचा प्रश्न हाताळला म्हणून त्यांचे अभिनंदन करतो. अशी जर मदत मिळत नसेल तर त्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निर्णय घेतील. रोहित पवार यांनी जनतेचे प्रश्न मांडावे रोज उठून आमचे नेते सुनिल तटकरे , प्रफुल्ल पटेल यांच्यावर टिका करत राहण्यापेक्षा. लोक हिताचे काही करावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *