महाराष्ट्रातल्या दुर्गम गावातली कथा, प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ, थरार.. दुसऱ्या आठवड्यातही दमदार प्रतिसाद
गूढ, थरार आणि सत्याच्या शोधाचा प्रभावी संगम साधणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची मनं जिंकली. आता दुसऱ्या आठवड्यातही त्याच दमदार प्रतिसादासह ‘सालबर्डी’ची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. रहस्यमय कथानक, अनपेक्षित वळणं आणि उत्कंठावर्धक सादरीकरण ही ‘सालबर्डी’ची प्रमुख वैशिष्ट्यं ठरत आहेत. प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ आणि त्याचा उलगडा करण्याची सततची धडपड प्रेक्षकांना शेवटपर्यंत…