उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा शेवट जीवावर बेतला, एकाच दिवसात घडलं असं काही की… महाराष्ट्र हळहळला
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपता संपता राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून ५ जणांचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. सांगलीत एका निवासी शाळेच्या जलतरण तलावात १२ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावात ३ अल्पवयीन मुलांचा आणि भंडाऱ्यात देवदर्शनासाठी आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे….