Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या भागांसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. माहितीनुसार, उल्हास नदीची इशारा पातळी 17.50 मीटरवर पोहोचली असून, नदीकाठच्या काही सखल…