
अलीकडेच महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीबाबतचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रशासकीय तिजोरीला 32 हजार कोटींची गळती लागल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल कॅग रिपोर्ट्सकडून आला आहे, इतकेच नाही तर ही गळती नेमकी कशामुळे लागली हेदेखील समोर आलं आहे.
कॅग रिपोर्ट्सनुसार, राज्याच्या प्रशासकीय तिजोरीला अनेक वाहनांचा कर थकवणाऱ्यांमुळे मोठे नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. याविषयी आरटीओला थेट सवाल करण्यात आला आहे की, हजारो वाहनांचा कर थकवणाऱ्यांवर RTO मेहेरबान का? महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून 10 हजार 352 कोटींची थकबाकी प्रलंबित आहे.