महाराष्ट्राला उन्हाचा तडाखा; उष्माघातामुळे 3 बळी, कोंबड्याही दगावल्या, शाळांना सुट्टी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्रात उष्णतेचा कडाका चांगलाच वाढल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात उष्णतेची लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला आहे. याचा मोठा परिणाम दैनंदीन कामकाजावर होताना दिसत असून, रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे. परभणीमधून मोठी बातमी समोर येत…