पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाऊ नका, अन्यथा उद्भवतील गंभीर आरोग्याच्या समस्या
देशभरातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळालेला आहे. पावसाळा सुरू झाल्याने अनेकांनी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करण्यास सुरूवात केली आहे. कारण या हंगामात विविध आरोग्य समस्या आणि संसर्गाचा धोका वाढत असतो. वाढलेल्या आर्द्रतेमुळे जिवाणू, विषाणू आणि बुरशी यांची वेगाने वाढ होत असते ज्यामुळे काहींना अन्नातून विषबाधा, पोटाचे विकार…