Headlines

IPL स्पर्धेतील या सामन्यात फिरकीपटूंनी एकही चेंडू टाकला नाही, 18 वर्षात इतक्यांदा घडलं असं

IPL स्पर्धेतील या सामन्यात फिरकीपटूंनी एकही चेंडू टाकला नाही, 18 वर्षात इतक्यांदा घडलं असं
IPL स्पर्धेतील या सामन्यात फिरकीपटूंनी एकही चेंडू टाकला नाही, 18 वर्षात इतक्यांदा घडलं असं


IPL स्पर्धेतील या सामन्यात फिरकीपटूंनी एकही चेंडू टाकला नाही, 18 वर्षात इतक्यांदा घडलं असंImage Credit source: PTI

आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व सुरू असून आता स्पर्धा अंतिम टप्प्याच्या दिशेने कूच करत आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सची काठावरची लढाई सुरू आहे. एका सामन्यात पराभव होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. दिल्ली कॅपिटल्सचा प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे पंजाब किंग्सविरुद्धचा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्सने 3 गडी राखून सामना जिंकला. पण या सामन्याची वेगळी असी खासियत ठरली. या सामन्यात फिरकीपटूने एकही षटक टाकलं नाही. या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या फिरकीपटूंना षटक दिलं नाही. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी या सामन्यात एकूण 10 गोलंदाजांना संधी दिली. त्यांनी एकूण 39 षटकं टाकली. यात एकही फिरकीपटू नव्हता. म्हणजेच 39 षटकं वेगवान गोलंदाजांनी टाकली.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात फिरकीपटूंनी गोलंदाजी न देण्याची ही काय पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही आयपीएल स्पर्धेत असं चित्र पाहायला मिळालं आहे. आयपीएलच्या पहिल्याच पर्वात असं घडलं होतं. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात असं घडलं होतं. हा सामना 28 एप्रिल 2008 रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झाला होता. यात एकही षटक फिरकीपटूंनी दिलं गेलं नाही. या सामन्यात 10 गोलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. पण यात एकही फिरकीपटू नव्हता. हा आयपीएल 2008 मधील 15वा सामना होता आणि यात 10 गोलंदाजांनी 39.4 षटकं टकाली होती.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 18 वर्षानंतर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हा दुसरा सामना होता. यात एकाही फिरकीपटूने गोलंदाजी केली नाही. फिरकीपटूला गोलंदाजी न देण्याचं कारण म्हणजे खेळपट्टी ही फिरकीला अनुकूल नव्हती. वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने त्यांचा पुरेपूर फायदा घेतला गेला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल आहे. पण त्यानेही गोलंदाजी केली नाही. तर श्रेयस अय्यरने अर्शदीप सिंग, यश ठाकुर, मार्को यानसेन, बेन ड्वार्शुइस आणि मार्कस स्टोइनिस या वेगवान गोलंदाजांना संधी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *